Pages

Sunday, 10 November 2013

रविवारची संध्याकाळ

रविवारची संध्याकाळ मराठी चित्रपट के नाम अशी असायची . जुने प्रभातचे मराठी चित्रपट मधल्या काळातील ग्रामीण बाज असणारे लावणीपट ते अगदी लहान मुलांचा आवडता लक्ष्याचे विनोदी चित्रपट अशी चंगळ असायची . माझ्यासाठी तर आई आणि आज्जी यांच्यासोबत हे चित्रपट पाहणे म्हणजे एक आगळा वेगळा उत्सव असायचा . आजूबाजूला असणाऱ्या दहा बारा घरात अगदी हेच चित्र असायचे satellite वर फिक्स केलेल्या मल्टीप्राईड सारखे असो 

आज सहज आठवण आली ती अशाच एका रविवारी पाहिलेलेया चित्रपटातल्या एका प्रसंगाची . तो चित्रपट "देव बाप्पा की हा माझा मार्ग एकला हे नीटस आठवत नाही " पण प्रसंग असा आहे 
त्या लहान मुलाला /मुलीला कुणी सांगितले असते देवाघरी तुझी आई गेली आहे म्हणून तो लहान मुलगा /मुलगी देवाला पत्रे लिहतो "देवबाप्पा तू माझ्या आईला माझ्या घरी लवकर पाठव मला तिची आठवण येते " अशी बरीच पत्रे तो /ती देवाला लिहतो त्यानंतर एक दिवस घरातले कुणी ज्येष्ठ व्यक्ती टेलिफोन exchange ला अमुक अमुक व्यक्तीचा फोन जोडून द्यायला सांगते तेव्हा या गोष्टीकडे त्या मुलीचे /मुलाचे लक्ष जाते आणि अगदी लक्षात ठेवून तो फोन करतो आणि बोलू लागतो "माझी आई देवाघरी आहे मी देवबाप्पाला खूप पत्रे लिहिली मला माझ्या आईशी बोलायचे आहे देवबाप्पाला फोन जोडून द्या " त्याचे हे बोलणे ऐकून telephone operator असणाऱ्या बाईचे डोळे पाणावतात आणि ती मग त्याची आई आहे अस समजूनच बोलते . हे सार पाहताना मी सुद्धा अगदी रडत होते मी माझ्या उजव्या आणि डाव्या बाजूला बसलेल्या आई आणि आज्जी दोघीपण पण लपून लपून डोळ्यातले पाणी पुसत होत्या मी आज्जीला विचारले "आजी तू रडतेस ?" आजीचे बोलणे शिव्याप्रधान असायचे त्यामुळे लगेच ती ओरडली "हट मेल्या रांडीच्या ,चल तिकड " जुन्या रूढी परंपरा मानणारी ती असल्याने भावना व्यक्त न करणे हे तिच्या शिस्तीत बाणले होते त्यामुळे साहजिकच माझ्या प्रश्नावर तिची अशी तिखट प्रतिक्रिया पाहायला आणि ऐकायला मिळाली

असाच आणखी एक प्रसंग मला आठवतो तो सह्याद्री मालिकेवरील . नुकतच नवीन लग्न झालेलं जोडप पुढे काही दिवसात त्यांचेघरी बाळ जन्माला येते . बाळाला जन्म देवून आई जाते . बाळाचा बाबा दुःखी निराश हतबल झालेला . अचानक बाळ रडायला लागते तेव्हा तो भानावर येतो . बाळाला भूक लागली असेल असे समजून वाटी चमच्याने दुध बाळाला दुध पाजवतो तरी रडणे थांबत नाही . त्याला काही वेळ खेळवतो तरीही बाळ तसेच रडत राहते . अचानक त्याला काही आठवते तो बाळाला पाळण्यात निजवतो आणि ट्रंकेकडे जातो त्यातील त्याच्या पत्नीच्या एकेक साड्या उचलतो त्यांना कुरवाळतो आणि लगेचच एक साडी नेसून आपल्या पत्नीसारखा अंबाडा त्यावर गजरा कपाळावर कुंकू आणि तिचेच अलंकार स्वतः परिधान करतो . पाळण्यापुढे जातो तस बाळ त्याच्याकडे पाहून खुदकन हसते .

मालगुडी डेज मधिलहि काही अश्याच कथा मनाचा ठाव घेणाऱ्या फार तरल आहेत अगदी ओंजळीत प्राजक्त गळावा अश्या हे सार nostalgic किंवा भावनाप्रधान भावविवश करणारे असते तरीही मी पुन्हा पुन्हा आठवते वाचते काही संवेदना जाग्या आणि शिल्लक राहाव्यात त्या कधीच कुठेही संपू नयेत वाटत अगदी श्यामची आई हे पुस्तकही शाळा संपल्यावरही मी खुपदा वाचले आहे . असो रविवारची संध्याकाळ अशीच काहीशी "ग्रेसफुल-भय इथले संपत नाही मज तुझी आठवण येते "  

-----कविता मोकाशीA

No comments:

Post a Comment