दुष्काळ
दुपारच्या भुकेच्यावेळी
ओँजळीच्या तुकड्यात पाणी नाही
फुले नाहीत
सहज हाताळला जातो आहे कवडसा
भेगाळत नाही भुक
साखळत नाही रक्त
उष्ण होत नाहीत पापण्यांचे कड
पडू देत नाहीत
वांझोटीची सावली
कोवळ्या उन्हावर
इंद्रधनुष्य दिसले की
तिच्या गर्भातच
निजुन जातो पाऊस
बसत नाहीत कायद्यात
त्याच्या तुझे
दत्तक वारसे
फक्त जाहीर होतो
दुष्काळ
वांझोटीच्या सवाष्ण मरणासारखा
---कविता
No comments:
Post a Comment