तो गेला
शब्दनिर्मिती ठरली गौण
तो गेला निमिषात पुढे
मी केला आर्तभक्ती नाद
वाजवुनी कवितेचे चामडे
रक्तअश्रु ना कसला ओघळ
ओठात फक्त दीनगाणी
पाऊस झाला अंगणापुरता
घरात जमली भिक्षानाणी
आता वाटले निजेत उठावे
भेटुन घ्यावे अलिप्त अंबर
शापवंचना अभिमुख माझे
चंद्रडागाचे स्मरले अत्तर
तो गेला तो गेला तसाच
आल्या पावसातून नाहुन
निळी निळी शाई नभाची
मेघ होड्या त्यात वाहुन
-----कविता
No comments:
Post a Comment