"अनेक कारणांनी अस्वस्थ आहे ती …. पण जेवढी समजली आहे कविता ती दुःखाची आहे अस्वस्थतेची आहे कल्पनेची आहे एकांताची आहे एकटीची आहे तरी रम्यतेची आहे . तिला मुळात चारचौघात रमणे आवडत नाही . तिचा असण्यापेक्षाही नसण्यावर विश्वास आहे . तिला जाणीवा जखमा खोल असतात हे ठाऊक नाही तिने फक्त डोळ्यातले अश्रु मोजुन ठरवली आहे वेदनेची व्याख्या .नजर पाहुन ठरवली आहे प्रेमाची व्याप्ती. ती आहे सत्यतेपासुन कैक मैल दूर तिला ठाऊक नाहीत उन्हाचे चटके तिला नाही सावलीची माया . तिला नाही माहित आभाळाचे ठिगळ असेलच माहित तर तिला तिचे नसणे ठाऊक आहे . मी विचार करते आहे आजवर लिहलेल्या सगळ्या कविता फाडुन टाकाव्यात आणि मुक्त कराव आता या कवितेला .
ती माझ्या जगण्याचे प्रश्न सोडवत होती की नाही माहित नाही . तिने मला जगायला शिकवले की नाही माहित नाही . पण अभिमानाचे बुरुज आणि अपमानाचे तुरुंग घेऊन ती मिरवणारी नाही
तिची व्यक्तता आहे माझ्यापुरती क्षणिक तरी अमर्याद . प्रत्येक वेळी ती अशाप्रकारे भेटत गेली आहे की तिचे गेल्यावेळचे भेटणे आभास वाटावे . आताही प्रत्येक पान उलटुन पाहिले की आभास वाटतो आहे पण या सारयाला खोट शुन्य तरी कसे ठरवु असा प्रश्नदेखील मला पडलेला नाही कारण माझ्या कवितेची ओळख पटली आहे मला . ती शोधत आहे तिचे नसणे शुन्य होऊन जाणे म्हणुनच मुक्त करत आहे मी तिला माझ्या व्यक्ततेपासुन
कविता लिहणे थांबवित आहे . काही महिने काही वर्ष कदाचित आयुष्यभरासाठी . तिचे नसणे तिला उमजु लागले तर ती येईल मला भेटायला . तोवर हा निरोपाचा प्रवास आनंदाने सुखाने शांततेने .
अर्थातच कविता लिहणे थांबवले म्हणजे जगणे थांबले नाही आता शोध नव्या जाणिवांचा नव्या लेखनाचा नव्या ध्यासाचा नव्या कल्पनांचा ."
______________________________________________________________________________
सुटका
गर्र चाक फिरलं
रहाट गडगडल
उफ्फ दोर निसटला
घागर कलंडली
तळाशी बुडाली
तळ गाठून
पुन्हाशी वर आली
कलई काळवंडली
पोच गेला ........
जगण्याला कसला तडा गेला
अन मरणाचा घडा अर्धाच भरला
गळकी घागर ....
गोल विहरीत फिरते आहे
बुलंद भितीस धडकते आहे
गळक्या छिद्रातूनच तरंगते आहे
कधी डोळे मिचकावून
आकाशाकडे एकटक पाहते आहे
कधी डोळे गच्च मिटून
खोल पाण्यात रमते आहे
नक्की काय हव आहे तिला
जगण कि मरण ?
जगण्याची मुक्तता
कि मरणाची अधीरता ....
आकाशाची उंची
कि गर्भ जमिनीची खोली
का तिला हवी आहे
फक्त सुटका ??
____________________________________________________________________________________
सुटका
गर्र चाक फिरलं
रहाट गडगडल
उफ्फ दोर निसटला
घागर कलंडली
तळाशी बुडाली
तळ गाठून
पुन्हाशी वर आली
कलई काळवंडली
पोच गेला ........
जगण्याला कसला तडा गेला
अन मरणाचा घडा अर्धाच भरला
गळकी घागर ....
गोल विहरीत फिरते आहे
बुलंद भितीस धडकते आहे
गळक्या छिद्रातूनच तरंगते आहे
कधी डोळे मिचकावून
आकाशाकडे एकटक पाहते आहे
कधी डोळे गच्च मिटून
खोल पाण्यात रमते आहे
नक्की काय हव आहे तिला
जगण कि मरण ?
जगण्याची मुक्तता
कि मरणाची अधीरता ....
आकाशाची उंची
कि गर्भ जमिनीची खोली
का तिला हवी आहे
फक्त सुटका ??
____________________________________________________________________________________
---कविता मोकाशी

No comments:
Post a Comment