अजब रसायन अंजली
आज आमच्या केबलवाल्याने कुछ कुछ होता है पिक्चर लावला होता ,पहात बसले अगदी स्टार्ट टु एन्ड शिवाय केबलचा असल्याने मध्ये मध्ये जाहिरातीची चुळबुळ नाही . तर साधारण मी इयत्ता तिसरीत असताना दिवाळीच्या मोसममध्ये क्लासहुन येताना चकलीच्या भाजाणीच्या वासासोबत ,काही घरांच्या दारातून ,बाजारातल्या काही दुकानातून ,लोकांच्या शिळेतून ,कुछ कुछ होता है मधली गाणी ऐकत घरी यायचे आणि जायचे त्यावेळी एकदम सुपर डुपर हीट असा तो सिनेमा झाला होता .तरीही थेटर जाऊन पाहण्याचे लाड काही आईने चालवुन घेतले नाहीत.
त्यानंतर ठीक दोन वर्षाँनी मात्र आजोळी मामाच्या टी व्हीवर हा चित्रपट पहायला मिळाला अगदी मनापासुन आणि मनभरुन रडले हा चित्रपट पाहुन .आठ वर्षाच्या अंजलीला माँ विषयावर बोलायला सांगितले जाते तिथपासुन अगदी शेवटी काजोलला म्हणजे अंजलीला तिच्या लग्नादिवशी राहुल भेटायला येतो तिथपर्यँत मनसोक्त रडले आणि हसलेसुध्दा बर . मला आमच्या मराठीच्या बाईँनी सांगितले होते तु ययाती कांदबरी वयाच्या तीन टप्प्यांवर वाच तुला नव्याने कांदबरी कळेल त्यापैकी दोनदा वाचुन झाली पण वेगळे काही वाटले नाही .मात्र कुछ कुछ होता है चित्रपट दरवेळी मी पाहत गेले तसा मला वेगवेगळा भावत गेला .
म्हणजे अगदी पहिल्यांदा पाहिला तेव्हा काजोलचे उपेक्षित राहिलेले प्रेम आणि पुन्हा शारुख काजोल यांचे शेवटी मनोमीलन याबद्दल खुप उत्कंठावर्धक प्रेम वाटत राहिले नंतर नंतर त्यातील टीना हे राणी मुखर्जीने साकारलेल व्यक्तीमत्व तिच्यावर अगदी सवत असुयेने द्वेष केला टीना मुळे काही काळ राणी मुखर्जी माझी नावडती नटी बनली होती तिचा तो टिपीकल घोगरा आवाज तिचे कॅट आईज हे खरतर तिच्या प्रसन्न व्यक्तीमत्वाला शोभा आणणारे सौँदर्य आविष्कार आहेत पण चार दिवस सासुचे अवंतिका भाग्यविधाता असल्या काही मालिकांचे तेलबुध्दी संस्कार झाल्याने टीनामुळे राणी मुखर्जीवरही मी जळफळाट केला होता अगदी बोटसुध्दा मोडली .
असो तर सांगत काय होते हा कुछ कुछ होता है मला दरवेळी वेगळा भावतो . यातल्या काजोल हिने साकारलेली अंजली हे व्यक्तीमत्व तस मला अगोदरपासुन भावले आवडले आहे . मुळात नायकावर भरभरुन प्रेम करणारी नायिका तसा माझ्या आकर्षणाचे वेडाचे भाग आहे .म्हणजे जयवंत दळवीच्या महानंदा पासुन एका लग्नाची दुसरी गोष्ट मधल्या राधा पर्यँत . प्रचंड भावभक्तीने प्रेमाबद्दल आदर बाळणारया अशा नायिका मला विलक्षण वाटतात . तशीच कुछ कुछ होता है मधली अंजली मधल्या काही काळात तिने राहुलवर केलेले प्रेम यत्किँचितही विसरलेले नाही हे पाहुन मी खरोखर आतुन हलले होते . तीच गोष्ट टीनाची वर म्हटल्याप्रमाणे हे कॅरटर किँवा हीने राहुलवर केलेले प्रेम हे समजायला मला उशीर लागला .
पण ज्या नायकावर या दोघी प्रेम करत आहेत तो राहुल मात्र या नात्यांच्या बंधनात सॉल्लीड कनफ्युज वाटला मैत्री म्हणजे प्रेम आणि प्रेम म्हणजे मैत्री हा त्याच्या वाट्याला असणारा डायलॉग पण तितकाच संभ्रम अवस्थेत त्याला नात हव आहे पण बंधन नको अशी त्याची अवघड भाव अवस्था आहे त्यासाठीच तो अनेक मुलीँमागे धावतो आहे असे दाखवले आहे अर्थात यात फिल्मी मेलोड्रामा पण आहे . तरीही त्याला खरे प्रेम समजले नाही असे शेवटपर्यँत मला वाटत राहिले टीनाच्या मरणानंतर येणारे एकटेपण मग काही कारणाने अंजलीची होणारी पुर्नभेट अस सार काही संमिश्र वाटत पण टीनाने राहुलला पुर्ण ओळखल्याने तिला त्याचे अंजलीवरचे प्रेम कळते लक्षात येते असे वाटते त्यासाठीच हा सगळा खटाटोप आठ वर्षाची अंजली करते . त्यामुळे या चित्रपटाला कधी लव्ह स्टोरी म्हणावेसे वाटले नाही पण कथा मात्र अतिउत्कुष्ट तर एकुण आजही माझ्या आवडत्या चित्रपटांपैकी हा चित्रपट आहे .
तर तोच आता पाहून आले ,बाकी पूल म्हणतात ते अगदी खर चित्रपट नेहमी जत्रेत जाणाऱ्या लहान मुलाप्रमाणे पहावे म्हणजे त्यात हरवायला मज्जा येते
असो
लेट चिअर्स
फॉर द मेलोडीअस साँग
त्यानंतर ठीक दोन वर्षाँनी मात्र आजोळी मामाच्या टी व्हीवर हा चित्रपट पहायला मिळाला अगदी मनापासुन आणि मनभरुन रडले हा चित्रपट पाहुन .आठ वर्षाच्या अंजलीला माँ विषयावर बोलायला सांगितले जाते तिथपासुन अगदी शेवटी काजोलला म्हणजे अंजलीला तिच्या लग्नादिवशी राहुल भेटायला येतो तिथपर्यँत मनसोक्त रडले आणि हसलेसुध्दा बर . मला आमच्या मराठीच्या बाईँनी सांगितले होते तु ययाती कांदबरी वयाच्या तीन टप्प्यांवर वाच तुला नव्याने कांदबरी कळेल त्यापैकी दोनदा वाचुन झाली पण वेगळे काही वाटले नाही .मात्र कुछ कुछ होता है चित्रपट दरवेळी मी पाहत गेले तसा मला वेगवेगळा भावत गेला .
म्हणजे अगदी पहिल्यांदा पाहिला तेव्हा काजोलचे उपेक्षित राहिलेले प्रेम आणि पुन्हा शारुख काजोल यांचे शेवटी मनोमीलन याबद्दल खुप उत्कंठावर्धक प्रेम वाटत राहिले नंतर नंतर त्यातील टीना हे राणी मुखर्जीने साकारलेल व्यक्तीमत्व तिच्यावर अगदी सवत असुयेने द्वेष केला टीना मुळे काही काळ राणी मुखर्जी माझी नावडती नटी बनली होती तिचा तो टिपीकल घोगरा आवाज तिचे कॅट आईज हे खरतर तिच्या प्रसन्न व्यक्तीमत्वाला शोभा आणणारे सौँदर्य आविष्कार आहेत पण चार दिवस सासुचे अवंतिका भाग्यविधाता असल्या काही मालिकांचे तेलबुध्दी संस्कार झाल्याने टीनामुळे राणी मुखर्जीवरही मी जळफळाट केला होता अगदी बोटसुध्दा मोडली .
असो तर सांगत काय होते हा कुछ कुछ होता है मला दरवेळी वेगळा भावतो . यातल्या काजोल हिने साकारलेली अंजली हे व्यक्तीमत्व तस मला अगोदरपासुन भावले आवडले आहे . मुळात नायकावर भरभरुन प्रेम करणारी नायिका तसा माझ्या आकर्षणाचे वेडाचे भाग आहे .म्हणजे जयवंत दळवीच्या महानंदा पासुन एका लग्नाची दुसरी गोष्ट मधल्या राधा पर्यँत . प्रचंड भावभक्तीने प्रेमाबद्दल आदर बाळणारया अशा नायिका मला विलक्षण वाटतात . तशीच कुछ कुछ होता है मधली अंजली मधल्या काही काळात तिने राहुलवर केलेले प्रेम यत्किँचितही विसरलेले नाही हे पाहुन मी खरोखर आतुन हलले होते . तीच गोष्ट टीनाची वर म्हटल्याप्रमाणे हे कॅरटर किँवा हीने राहुलवर केलेले प्रेम हे समजायला मला उशीर लागला .
पण ज्या नायकावर या दोघी प्रेम करत आहेत तो राहुल मात्र या नात्यांच्या बंधनात सॉल्लीड कनफ्युज वाटला मैत्री म्हणजे प्रेम आणि प्रेम म्हणजे मैत्री हा त्याच्या वाट्याला असणारा डायलॉग पण तितकाच संभ्रम अवस्थेत त्याला नात हव आहे पण बंधन नको अशी त्याची अवघड भाव अवस्था आहे त्यासाठीच तो अनेक मुलीँमागे धावतो आहे असे दाखवले आहे अर्थात यात फिल्मी मेलोड्रामा पण आहे . तरीही त्याला खरे प्रेम समजले नाही असे शेवटपर्यँत मला वाटत राहिले टीनाच्या मरणानंतर येणारे एकटेपण मग काही कारणाने अंजलीची होणारी पुर्नभेट अस सार काही संमिश्र वाटत पण टीनाने राहुलला पुर्ण ओळखल्याने तिला त्याचे अंजलीवरचे प्रेम कळते लक्षात येते असे वाटते त्यासाठीच हा सगळा खटाटोप आठ वर्षाची अंजली करते . त्यामुळे या चित्रपटाला कधी लव्ह स्टोरी म्हणावेसे वाटले नाही पण कथा मात्र अतिउत्कुष्ट तर एकुण आजही माझ्या आवडत्या चित्रपटांपैकी हा चित्रपट आहे .
तर तोच आता पाहून आले ,बाकी पूल म्हणतात ते अगदी खर चित्रपट नेहमी जत्रेत जाणाऱ्या लहान मुलाप्रमाणे पहावे म्हणजे त्यात हरवायला मज्जा येते
असो
लेट चिअर्स
फॉर द मेलोडीअस साँग
तुम पास आए यु मुस्कुराए
तुमने न जाने क्या सपने दिखाए
अब तो मेरा दिल जागे न सोता है
क्या करु हाए कुछ कुछ होता है
.
------कविता मोकाशी
No comments:
Post a Comment