कविता एकटी असते .......
काल पासून मनाच्या दारावर
आवाज येतो आहे ठक ठक
कुणी आहे का ? मी दार उघडलं
सवयीप्रमाणे .....माझ्या .....
विचारलं ....सवयीप्रमाणे .....
कोण ग तू ?
गुबरे गाल वर आलेलं नाक
खळग्यातले डोळे डोळ्यात खळी
गालावर कळी...केसातली पाकळी
सार कुठेतरी पहिल्यासारख
कोण ??कविता ...माझी कविता ??
पण आता का आलीस तू ???
अग सुख अनावर झाल ...
तेव्हा झेलायला आलीस ...ठीक होत
दुख ठेचकाळत होते
तेव्हा धरायला आलीस ...ठीक होत
वेदना खोल खोल गेल्या
त्यांना भरायला आलीस ...ठीक होत
भावनांची चाळण झाली
पाखडायला आलीस ...ते ठीक होत
पण आज......?? अचानक ??
का ग ?? काय झाले ??
काय म्हणतेस .....
आणि कागद म्हणजे कफन आहे ? .....
आणि प्रतिभा कल्पना वेदना ....
...साऱ्या जिवंत दफन आहेत ...
ती बघ त्यांची राख ...काळ्या शब्दातली ...
आणि ते निथळणार विष ....निळी शाई
बस्स...इतकाच न ...मग त्याचे काय ...
अग वेडे .....माहित नाही का तुला
आपल नात तर कधीच तुटल आहे
तू ....तुझा हात मला आधार ...
म्हणून ....दिलास तेव्हाच ......
आणि मी तुला आधीच सांगितलं होत
कवितेने फक्त सोबत करायची असते
सोबतीची इच्छा मुळीच नाही करायची
कारण कवितेला प्रस्तावना नसते
आणि शेवटही नाही .....
....कविता एकटी असते ...फक्त एकटी ....
-----कविता (प्रस्तावना नाही शेवट नाही)
काल पासून मनाच्या दारावर
आवाज येतो आहे ठक ठक
कुणी आहे का ? मी दार उघडलं
सवयीप्रमाणे .....माझ्या .....
विचारलं ....सवयीप्रमाणे .....
कोण ग तू ?
गुबरे गाल वर आलेलं नाक
खळग्यातले डोळे डोळ्यात खळी
गालावर कळी...केसातली पाकळी
सार कुठेतरी पहिल्यासारख
कोण ??कविता ...माझी कविता ??
पण आता का आलीस तू ???
अग सुख अनावर झाल ...
तेव्हा झेलायला आलीस ...ठीक होत
दुख ठेचकाळत होते
तेव्हा धरायला आलीस ...ठीक होत
वेदना खोल खोल गेल्या
त्यांना भरायला आलीस ...ठीक होत
भावनांची चाळण झाली
पाखडायला आलीस ...ते ठीक होत
पण आज......?? अचानक ??
का ग ?? काय झाले ??
काय म्हणतेस .....
आणि कागद म्हणजे कफन आहे ? .....
आणि प्रतिभा कल्पना वेदना ....
...साऱ्या जिवंत दफन आहेत ...
ती बघ त्यांची राख ...काळ्या शब्दातली ...
आणि ते निथळणार विष ....निळी शाई
बस्स...इतकाच न ...मग त्याचे काय ...
अग वेडे .....माहित नाही का तुला
आपल नात तर कधीच तुटल आहे
तू ....तुझा हात मला आधार ...
म्हणून ....दिलास तेव्हाच ......
आणि मी तुला आधीच सांगितलं होत
कवितेने फक्त सोबत करायची असते
सोबतीची इच्छा मुळीच नाही करायची
कारण कवितेला प्रस्तावना नसते
आणि शेवटही नाही .....
....कविता एकटी असते ...फक्त एकटी ....
-----कविता (प्रस्तावना नाही शेवट नाही)
No comments:
Post a Comment